Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांची शेती यावर्षी देखील पाण्यात ? दिवेआगर येथील खारभूमी दरवाजांसाठी भूमिपूजन; काम सुरूच नाही


शेतकऱ्यांची शेती यावर्षी देखील पाण्यात ? 

दिवेआगर येथील खारभूमी दरवाजांसाठी भूमिपूजन; काम सुरूच नाही 

रायगड वेध रमेश घरत शिस्ते 

 तालुक्यातील शिस्ते - दिवेआगर मार्गावरील यशवंती खारभूमीलगत असणाऱ्या सात उघडीचे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात घुसत आहे. यावर उपाययोजना म्हणून खारभूमी विभागाने पंधरा लाखांचे दुरुस्ती चे काम हाती घेतले मात्र भूमिपूजन होऊन एक महिना होत आला तरी कामाची सुरुवात न झाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिस्ते, दिवेआगर,कापोली, बोर्लीपंचतन या परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात समुद्राच्या खाडी चे पाणी शिरत असल्याने   त्यांना गेली चार वर्षे भातशेतीला मुकावे लागत आहे.  परिसरातील 4 ते 5 गावांतील अनेक शेतकऱ्यांची साधारण 400 हेक्टर क्षेत्रात खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भातशेतीचे उत्पन्न घेतात. समुद्राच्या खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये यासाठी भक्कम दरवाजे असलेली 'सात उघडी' आहे. मात्र, गेली सलग तीन चार वर्षे उधाणाच्या भरतीमुळे हे दरवाजे उध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जाते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अतिशय गंभीर असते. हाताशी आलेली पिके उधानाच्या पाण्यामुळे नष्ट होतात.  

शेतीची सुपीकता धोक्यात - 

यावर उपाय म्हणून खारभूमी सर्व्हेक्षण व अन्वेक्षण विभागाकडून पंधरा लाखांचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी सतरा फेब्रुवारी 2023 तारखेला माणगाव येथील दीपेश पाटोळे या कंत्राटदाराला कामाचे आदेश देण्यात आले.  शिवसेनेचे  (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख शाम भोकरे यांनी अथक प्रयत्न करुन यशवंती खार भुमी सात उघडीसाठी 18 लक्ष निधी मंजूर करण्यात यशस्वी झाले शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख श्यामकांत भोकरे व परिसरातील शेतकरी यांना सोबत घेऊन त्यांच्या उपस्थितीत 7 एप्रिल ला भूमिपूजन देखील झाले मात्र त्यानंतर काम सुरू झालेच नाही उलट दुरुस्तीच्या नावाखाली तीन दरवाजे सुस्थितीत असताना नवीन दरवाजे बसविन्याच्या कामासाठी तोडण्यात आले व त्यामुळे आणखी पाणी शेतात जाऊन शेतीची सुपीकता धोक्यात आणली आहे. याला जबाबदार कोण ठेकेदार ? कि संबंधित विभाग असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

 शेतकरी आक्रमक 

- गेली चार वर्षे शेतीचे नुकसान होत असताना खारभूमी विभाग दुर्लक्ष देत आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले नाही तर परिसरातील सर्व शेतकरी आक्रमक होऊन तहसील कार्यालयात आंदोलन करू अशि चर्चा ऐकायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test