Type Here to Get Search Results !

शेतकरी बांधवांनी एसआरटी पद्धतीने भात लागवड केल्यास फायदेशीर ठरेल• शासन प्रोत्साहनपर खते, बियाणे अनुदान देणार

• शेतकरी बांधवांनी एसआरटी पद्धतीने भात लागवड केल्यास फायदेशीर ठरेल

• शासन प्रोत्साहनपर खते, बियाणे अनुदान देणार

रायगड वेध  श्रीकांत नांदगावकर तळा


सध्या भात पिक पद्धतीत बदल होत असुन एस आर टी पद्धतीने भात लागवड केल्यास ती अधिक फायदेशीर ठरेल असे तज्ज्ञांचे मत आहे.यासाठी शासन शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणुन अनुदान तत्वावर भात बियाणे,खते पुरवित असल्याने या पद्धतीने लागवड करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
    या पद्धतीमध्ये लागवड केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कर्जत -९ हे भात बियाणे २५ किलोची पिशवी १५००. रुपये असुन अनुदान ५०० रुपये असल्याने १००० रुपयांत हे बियाणे मिळत आहे.याचबरोबर यामध्ये युरिया ब्रिकेट खत शासन देणार आहे.तरी या पद्धतीने लागवड केल्यास ती फायदेशीर ठरेल.
    ही लागवड करताना शेताच्या जमिनीची उभी आडवी नांगरणी करून गादी वाफे तयार करावेत.वाफेंच्या मध्ये चरी असल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.पाऊस पडल्यावर जमिन ओली झाल्यानंतर साच्याच्या सहाय्याने भोक पाडून घ्यावीत. यामध्ये ५ ते ६ भाताचे दाणे टाकावे.व ती भोके मातीच्या सहाय्याने बुजवून घ्यावित.बियाणे उगवण्याआधी गोल नामक तृणनाशकाची फवारणी करावी.जेणे करून तण वाढणार नाहीत.मात्र ही फवारणी तातडीने करणे गरजेचे आहे.
   या पद्धतीमध्ये लागवड केल्यास एक एकर जमिनीमध्ये १६ किलो भात बियाणे लागते.भात बियाणे बुरशीजन्य औषधे लावुनच लागवड करावी.यासाठी आपल्या घरातील ५ ते ६ माणसे ६ तासात हे बियाणे लागवड करू शकतात.बियाणे टाकताना जास्त पाणी नसल्याची काळजी घ्यावी.बियाणे खोल गेल्यास बियाणे कुजण्याचा संभव असतो. त्यामुळे बियाणे वरती कसं राहील याची काळजी घ्यावी. तणनाशक हा महत्त्वाचा मुद्दा आहे.तणनाशक (गोल) तणनाशक
हे १ लिटर पाण्यात १ एम एल टाकुन पाठीवरील पंपाच्या साहाय्याने ही फवारणी करु शकतो. यामुळे तणांचा नाश होऊन भात पिक वाढीला अधिक वाव मिळेल.भात पिक वाढीसाठी
 सुफला १५:१५ हे खत द्यावे.हे खत बियाणे
टाकताना द्यावे.जेणेकरून रोपांची वाढ जोमदार व झपाट्याने होईल. या पद्धतीत रोपांची मशागत करावी लागत नाही.चिखलणी त्याचबरोबर नांगरणी व रोपांची पुनर्लागवड करावी लागत नाही.शिवाय मजुरीचा खर्च वाचतो.

             
  या नव्या पद्धतीने लागवड केल्यास शासन बियाणे अनुदान,खते, देत असुन शेतकरी बांधवांना यात नक्कीच फायदा होणार आहे.तरी शेतकरी बांधवांनी
याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
          आनंद कांबळे
      तालुका कृषी अधिकारी तळा
                
      
   सध्या या पद्धतीने लागवड केल्यास शासन एक एकर साठी १६ किलो बियाणे,६८ किलो युरिया ब्रिकेट,४००ml तणनाशक, तसेच ३ शेतकरी बांधवांना मिळुन एकटोकणयंत्र सुद्धा देणार आहे तरी शेतकरी बांधवांना या पद्धतीचा अवलंब करावा.
                      योगेश कोडी
                        कृषी सहायक सोनसडे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test