महाड तालुक्यात दुर्देवी घटना , महिलेने पोटाच्या सहा मुलांना टाकले विहिरीत; सहाही मुलांचा मृत्यू
रायगड वेध देवेंद्र दरेकर पोलादपूर
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील खरवली- बोरगाव मध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून एका महिलेने स्वतःच्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत टाकल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे व या क्रूर महिलेबद्दल संताप व्यक्त होत आहे
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ,आज सायंकाळच्या दरम्यान महाड तालुक्यातील बोरगाव हद्दीतील विहिरीत सध्या वास्तव्यासाठी महाड तालुक्यत असलेल्या उत्तर प्रदेश येथील रूना साहनी या महिलेने घरामध्ये भांडण झाल्याने राग मनात घेऊन आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत टाकून दिले असून संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरून टाकणारी ही घटना घडली आहे. यानंतर महिलेने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये स्वतःला हजर केली असल्याची माहिती प्राप्त झाली असून स्थानिकांच्या मदतीने चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येत असून संपूर्ण रायगड जिल्हा या घटनेने हादरला आहे