• ग्रामविकासाला तडजोड नाही- सरपंच ज्योती परकर
• बोर्ली पंचतन बौद्ध समाज मंदिर कामाचे भूमिपूजन
रायगड वेध अभय पाटील
बोर्ली पंचतन येथील विकासकामे राबवित असताना ग्रामपंचायत नेहमी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवूनच वाटचाल असेल यामध्ये कोणत्याहि प्रकारे तडजोड करणार नाही असे प्रतिपादन बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर यांनी केले. बोर्ली पंचतन येथील बुद्ध विहार कामाचे भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत 8 लक्ष रुपये मंजूर असलेल्या बोर्ली पंचतन येथील बौद्ध समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच नंदकिशोर भाटकर, माजी उपसरपंच मन्सूर गिरे, संतोष पयेर, माजी सदस्य चंद्रकांत तोडणकर, ग्रामपंचायत सदस्या भूमी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष गायकर, बोर्ली पंचतन बौद्ध मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष काशीराम हळदे, उपाध्यक्ष कृष्णा जाधव, खजिनदार मंगेश जाधव, सरचिटणीस सचिन हळदे, उपसर चिटणीस विलास पवार, चिटणीस संतोष खैरे, संपर्क प्रमुख नितीन वचकर तसेच स्थानिक मंडळाचे सरचिटणीस सुजय पवार, वसंत हळदे, बबन हळदे श्यामकांत जाधव सोनू पवार, सूर्यकांत जाधव, प्रदीप पवार, संदेश पवार, श्रीपाल कवाडे , महिला मंडळ अध्यक्षा सुमन जाधव, आशा पवार, शालिनी जाधव, रत्नप्रभा हळदे, नलिनी हळदे उपस्थित होते, यावेळी आपल्या मनोगतामध्ये सरपंच ज्योती परकर म्हणाल्या की, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्यातून बोर्ली पंचतन हद्दीमध्ये विकासकामांना गती मिळत आहे, बोर्ली पंचतन गाव विकासदृष्टीने निश्चित आदर्शवत राहील यासाठी
ग्रामविकासामध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड नसेल यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे आणि ते निश्चित मिळेल.